जालना-जळगाव रेल्वे धावणार, जाणून घ्या कोणकोणत्या तालुक्याला थांबा मिळणार?

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जालना ते जळगाव रेल्वे महामार्गामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होणार आहे. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरुळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनास्थळांवर पोहचणे देखील सुलभ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीवर केंद्र सरकारची नजर आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील आपली सत्ता कायम राहावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच एनडीए सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्प पार पडला होता.

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणतेही विशेष पॅकेजची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. इतकंच नाही, तर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले होते. यावरून विरोधक विधानसभा निवडणुकीत खोटा नॅरेटिव्ह पसरवू नये म्हणून सत्ताधाऱ्यांकडून या रेल्वे प्रकल्पाला मंजूरी दिल्याचं बोललं जातंय.

Leave A Reply

Your email address will not be published.