सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग

0

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली. वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत पण ते देखील अपयशी ठरत आहेत. कारण आग वाढतच चालली आहे.

गेल्या ३ दिवसांपासून डोंगरांना आग लागत असल्याची माहिती समोर आली आहे. धडगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत जंगलाला आग लागली असून झाडं जळून खाक झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगेतील डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे पाडे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. डोंगराला लागलेला आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत पण ते देखील अपयशी ठरत आहेत. कारण आग वाढतच चालली आहे.

झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणूनबुजून लावली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. वनमाफियांकडूनच या आग लावल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे देखील सांगितले जात आहे की, सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलामध्ये अज्ञातांकडून आग लावून सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. या घटनेमुळे जंगलातून मिळाऱ्या मौल्यवान वनस्पती, औषधं नामशेष होत चालली आहेत.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये हरीण, ससा, बिबट्या, माकड, अस्वल, कोल्हा, लांडगा यासारखे प्राणी आढतात. जंगलाला आग लागल्यामुळे यामध्ये यासारख्या अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वनमाफियांच्या या कृत्यामुळे प्राण्याचे वास्तव्य नष्ट होत चालले आहे. अशामध्ये पर्यायवरण प्रेमींकडून जंगल वाचवण्याची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.