गोवर्धने महाविद्यालयात नविन कायदेविषयक साक्षरता अभियान आयोजन प्रसंगी प्रतिपादन
सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची:मा. हरिष खेडकर
(उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण)
इगतपुरी |
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात गोवर्धने महाविद्यालय व नाशिक ग्रामीण पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदेविषयक साक्षरता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी हरिष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण, इगतपुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल तसरे, या साक्षरता अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड.सागर वालझाडे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य डाॅ.किरण रकिबे उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाला संबोधित करताना उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी ज्या प्रमाणे महाविद्यालये विद्यार्थांना सुसंस्कारित करतात त्याच प्रमाणे देशात नवनवीन कायदे, त्यातील सुधारणा समाजाच्या निकोप वाढीसाठी सरकारकडून मंजूर केले जातात पण त्याची अंमलबजावणी या कायदे काय आहेत ? कोणासाठी आहेत? त्यात काय बदल झालेत याबद्दल साक्षरता आवश्यक असते तरच या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी होऊ शकेल तर इगतपुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल तसरे यांनी या प्रसंगी उपस्थितींना मार्गदर्शक करताना शाळा- महाविद्यालयात नविन कायदेविषयक साक्षरता प्रभावी ठरल्यास तर उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन केले
तर या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड.सागर वालझाडे यांनी भारतीय दंड संहितेतील नावातील बदल भारतीय न्याय संहिता त्यात आलेले नवीन व सुधारित कायदे, कलमे, परिशिष्टे, संकल्पना समजावून सांगितल्या तर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांनी सायबर क्राईम या बाबत असणा-या कायद्यातील नवीन तरतुदी विद्यार्थांनी समजून घेतल्यास व सावधगिरी बाळगल्यास कोणत्याही फसवणुकीला व नकळत घडलेल्या गुन्हे शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम सांगळे तर प्रास्ताविक राकेश गायकवाड, आभारप्रदर्शन प्रा.संजय फाकटकर यांनी केले. या प्रसंगी डाॅ.विष्णू राठोड, प्रा.कन्हैया चौरेसिया, प्रा.गंगाधर कोल्हे, प्रा.भरत जाधव, श्रीमती सुनिता बेनाडे, अर्चना पाटील, अमोल टिळे उपस्थित होते.