कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींचा हायकोर्टाकडून जमीन मंजूर
मुंबई । कॉम्रेड गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कम्युनिस्ट पार्टीचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा कोल्हापूरच्या सम्राट नगर परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकलसाठी गेले होते. तेव्हा एक दुचाकी त्यांच्याजवळ आली आणि बाईकवरील दोघांनी पानसरे दांपत्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. या फायरिंगमध्ये गोविंद पानसरे आणि उमा पानसरे या दोघांचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किलोर यांनी या हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘बऱ्याच कालावधीपासून हत्या प्रकरणातील आरोपी कारावासात आहेत. प्रदीर्घ कारावास भोगलेल्या या आरोपींचा जामीन अर्ज मी स्विकारत आहे. आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे.’