खरिपाची बियाणे खरेदी करताय? कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना

0

मुंबई । सध्या खरीप हंगाम अगदी जवळ आला असलयाने शेतकरी वर्ग खरीपच्या तयारीला लागला आहे. एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रावर होणार आहे.मात्र अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे खरेदी करताना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन आहे तसेच कृषी विभागाने शेतक-यांना महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत.

काय आहेत सूचना जाणून घेऊया
बियाणे बॅग किंवा पॉकेटचे वेस्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती हे सर्व कापणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावी.
भेसळाची शक्यता वाटल्यास बियाण्याच्या पाकीट वरून खातर जमा करावी.
बियाण्याची उगवण क्षमता खात्रीसाठी पॉकेट वरील तारीख पाहून घ्यावी.
बियाण्याची पिशवी मोहर बंद असल्याची खात्री करावी.
कमी वजनाच्या निविष्ठा छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्ठा विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करा.

Leave A Reply

Your email address will not be published.