राज्यात अवकाळीचा जोर कायम? आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

0

पुणे । राज्यात अवकाळी पावसाचा जोर अद्याप कायम आहे. हा अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती 19 मे पर्यंत कायम राहील. 19 मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
दरम्यान आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, मुंबईसाठी उष्ण लाटेचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.