मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीक कारने पाच नागरिकांना उडविले

0

जळगाव । जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्यावर एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना धडक दिली. अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणीत समोर आले की, कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नागरिकांवर धडकली. या अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी यांचा समावेश आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून फरार झालेल्या कारमध्ये दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद झाले आहे. इतकंच नाही, गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि वर्दीसुद्धा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. यामुळे अपघात साधा अपघात नसून काहीतरी गूढ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

रहस्य अजून उलगडलेले नाही
गाडीवरील दोन नंबर प्लेट आणि पोलिस ड्रेसमुळे येथील रहस्य अधिक गहन झाले आहे. लोकांच्या तर्कवितर्कानुसार, हे अपघात खऱ्या अपघाताचा भाग आहे की, एखाद्या योजनाबद्ध प्रकारची कारवाई? हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.हरताळा फाटा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले

Leave A Reply

Your email address will not be published.