राज्यात रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ ; घराच्या किमती आणखी महाग
मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न आणखी महागल आहे. कारण राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये (खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे) वाढ केली आहे. राज्यात सरासरी ६ ते १० टक्क्यांनी खरेदी-विक्रीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. रेडीरेकनर दर दोन वर्षांनी वाढल्याने शहरातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे.
राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडी रेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे वार्षिक बाजारमूल्य दर लागू होतात. कोरोनामुळे एक एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर 2021 22 या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते.
कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सन 2022 23 या वर्षात राज्यात रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर ची दोन वर्ष म्हणजे 23 24 आणि 24 25 या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दर जैसे थे ठेवण्यात आला होते.2022 मध्ये 5.36% वाढ करण्यात आली होती.
रेडीरेकनर दरवाढ, घर महागणार
राज्यात रेडीरेकनर दरात 4.39% वाढ झाली. जळगावात ५.८१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईत 3.39% वाढ झाली तर मनपा क्षेत्रात 5.95%, ठाण्यात 6.26%, नाशिकमध्ये 7.32%, नवी मुंबईत 6.75%, सोलापुरात 10.17% व अमरावतीत 8.3% वाढ झाली. 2022-23 नंतर ही दरवाढ झाली आहे. 2025-26 पासून हे दर लागू होतील