राज्यातील सर्वसामान्यांना झटका : आजपासून लालपरीचा प्रवास महागला
मुंबई । राज्यातील सर्वसामान्यांना झटका देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे.
एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक ढाली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत त्यामुळे प्रत्येकवर्षी ही भाडेवाढ अपेक्षित असते. पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही दरवाढ न झाल्याने एकत्रित रित्या एसटीच्या तिकीट दरात 14.95 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासूनच (24 जानेवारी 2025) लागू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.