इगतपुरी तालुक्यात ९१ गावात जलजीवन मिशन च्या योजनामध्ये ४० योजना अपूर्णच
तर अनेक योजनामध्ये भ्रष्टाचारच अधिकारी ठेकेदार संगनमताने कामे सुरु
आमदार हिरामन खोसकर यांच्या आढावाबैठकित जलजीवन च्या अधिकाऱ्यांची बोलती बंद
इगतपुरी |
इगतपुरी तालुक्यात जलजीवन मिशन च्या ९१ योजना सुरु असून त्या पैकी जवळपास ४० योजना धुळखात पडल्याचे गंभीर चित्र तालुक्यात स्पष्ट झाले आहे धरण उशाशी अन कोरडं घशाशी असा प्रकार तालुक्यात घडतं आहे अधिकारी अन ठेकेदार यांच्या संगमताने हे कामे सुरु असल्याचा आरोप आमदार हिरामन खोसकर यांनी केला असून दि १६ पर्यंत जर पूर्ण योजनाचे कामे सुरु झाले नाहीतर सबंधित अधिकारी निलंबित करण्यात येईल असा इशारा खोसकर यांनी दिला आहे.
तालुक्यात ४० गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची मर्यादा ओलांडली आहे. सदरील कामात पाईपलाईन योजनेसाठी केंद्र शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आलेला आहे, हे खरं पण गुत्तेदार आपल्या जवळील व्यक्तींना हाताशी धरून हे पाईपलाईनचे काम बोगसरीत्या करत असून पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तरी या कामाची केंद्रीय स्तरावरून तात्काळ चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. इगतपुरी तालुक्यातील संबंधित अधिकारी या कामाकडे लक्ष देतील का..? असे सामान्य नागरिक आपले मत व्यक्त करत आहेत. गुत्तेदार, कर्मचारी गांभीर्यपूर्वक लक्ष देतील का..? असे यावरून दिसत आहे. तालुक्यात नव्हे तर देशात चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा केंद्रीय पथकाकडून तपासणी कर्तव्यदक्ष अधिकार्यांनी या कामाची पाहणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कडू यांनी केली आहे त्याचप्रमाणे हे कामे इस्टिमेट प्रमाणे झालेले दिसून येत नाही. प्रशासनाला याची माहिती होऊ न देता हे गुत्तेदार आपल्या थोड्याशा मोबदल्यामुळे करोडो रुपयांच्या योजना बोगस करत आहेत. दरम्यान पाईपलाईनसाठी दोन ते अडीच फूट खोल खोदलेले खोदकाम खोदकाम आवश्यक असते परंतु संबंधित गुत्तेदार हे केंद्र व महाराष्ट्र शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत बोगसगिरीचे काम करून त्यातून मिळणारा पैसा ते आपल्या खिशात भरत आहे. या गुत्तेदारावर कोणाचे नियंत्रणही दिसत नाही, गुत्तेदाराचा मनमानी कारभार चालू झालेला दिसून येत आहे. तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन हा प्रकार इथेच थांबवावा व यात दोषी असणाऱ्या संबंधितावर शासनाने योग्य कार्यवाही करावी. अशी मागनी कडू यांनी केली आहे.
ही आहेत गावे
९१ योजना ६५ चे काम सुरु असून त्यातले हे गावे
धामणी पाणी पुरवठा योजना, पाडळी देशमुख, देवळे, बोरटेंभे , दौंडत, वाकी, बिटूरली, टाके घोटी, सातूर्ली, वांजोळे, आहुरली, जानोरी, बांडेवाडी, टिटोली, लहानगेवाडी, कोरपगाव, नांदगाव सदो, शेणवड बु, बोर्ली, तळोघ, मानवेढे, पिंपळगाव भटाटा, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, सांजेगाव, भावली खुर्द, कुरनोली, तळोशी, निनावी, चिंचलेखैरे, पिपंळगाव मोर
पिंपळगाव मोर, देवळे व आहूर्ली या गावामध्ये पाण्यासाठी तारेवारची कसरत करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यात असलेल्या या तिन्ही गावात पाण्यासाठी जीव मुठीत धरून पाणी आनावे लागत आहे तिन्ही गावानमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने महिलांना हायवे क्रॉस करून पाणी डोक्यावर न्यावे लागत आहे त्यामुळे योजना कधी पूर्ण होतील असा प्रश्न उपस्थिती होत आहे.