बांभोरी पुलावरून तरुणाने उडी घेऊन केली आत्महत्या

0

जळगाव । जळगाव शहराजवळील बांभोरी पुलावर एक धक्कादायक घटना घडली. २३ वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना जळगाव शहरातील रेणुका नगरात राहणाऱ्या शुभम सतीश चौधरी याच्या आत्महत्येसंबंधित आहे.

शुभम चौधरी हा तरुण यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी होता, परंतु तो जळगाव शहरातील रेणुका नगरात मामाकडे वास्तव्याला होता. तो कॅटरिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे आई-वडील सुरत येथे वास्तव्याला आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास शुभमने बांभोरी पुलावरून उडी घेतल्याचे रस्त्यावरील रिक्षा चालकांनी पाहिले व त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिसांना कळविले.

पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून शुभमला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुभमच्या पश्चात आई वंदना, वडील, भाऊ गिरीश आणि लहान बहीण कोमल असा परिवार आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.