संजय राऊतला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे, अन्.. गुलाबराव पाटील बरसले

0

जळगाव : एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे ते जसा आदेश देतात, त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले आहेत.आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्ष जो ही निर्णय घेईल; ते सर्व एकछत्री पद्धतीने एकनाथ शिंदे हेच घेतील; अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली असून याठिकाणी देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे म्हटले जात आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का असा प्रश्न अजूनही तसाच आहे. यातच एकनाथ शिंदे नाराज असलयाने ते त्यांच्या मूळगावी गेल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाहीर केले आहे, की माझ्याकडून कोणतेही अडचण नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने मुख्यमंत्री पदाचा विषय संपलेला आहे. यामुळे ते नाराज राहण्याचा विषयच येत नाही. असेही गुलाबराव पाटील म्हणाले

मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील हे देखील जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. मी सहाव्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे ज्या गावात मी मायनस राहील असे वाटत होते; त्या गावात निकालानंतर बघितले, तर मी खरच मायनस होतो. विरोधकांकडून लहान मुलांप्रमाणे रडीचा डाव चाललेला आहे. निवडून आले तर ईव्हीएम चांगले आहे आणि पडले तर ईव्हीएम खराब आहे.

राऊतांना दवाखान्यात ऍडमिट केले पाहिजे
संजय राऊत हा माणूसच राहिलेला नाहीये. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे. आधी त्यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता स्वतःही संपेल. संजय राऊत मेंटल झालाय. त्याच्या हातात दगड द्या, दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणा. अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.