पंतप्रधान मोदींनी जळगावच्या कार्यक्रमात परदेश दौऱ्याचा किस्सा सांगितला
जळगाव । जळगावमध्ये ‘लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींना केंद्र सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळाली आहे, असे म्हणत लाभार्थींचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारचेही कौतुक केले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली. सर्वप्रथम त्यांनी श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नेपाळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नेपाळ बस अपघाताची घटना घडली तसे आम्ही रक्षा खडसे ना तिथं पाठवले, केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
तसेच ” महाराष्ट्राचे संस्कार फक्त भारतात नाहीत जगभर पसरले आहेत. कालच मी परदेश दौऱ्यावरुन आलो. मी युरोपमधील पोलांडमध्ये गेले होतो तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले, इथल्या संस्काराचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप आदर करतात. पोलांडमध्ये महाराष्ट्राच्या लोकांना फार मोठा समूह आहे. आमचे जळगाव वारकरी परंपरांचे तीर्थ आहे, मुक्ताई ची ही भूमी आहे, बहिणाबाईंच्या ओळी प्रेरणा देणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातल्या बहिणीच छान काम करतात, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.