शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या 14 पिकांच्या हमीभावात वाढ
नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे केंद्र सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हमीभाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2018 साली घेतला होता. हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमीभाव ठरवले आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण 14 महत्त्वाच्या पिकांचा हमीभाव वाढवला आहे. धान या पीकाचे हमीभाव 2300 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. हा भाव गेल्या वर्षांच्या तुलनेत 117 रुपयांनी जास्त आहे. 2013-14 मध्ये धान या पिकाचा हमीभाव 1310 रुपये प्रति क्विंटल होता.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय
खालील पिकांचा हमीभाव वाढवा, नवा दर काय?
ज्वारी- 3,371 रुपये प्रति क्विंटल
नाचणी- 2,490 रुपये प्रति क्विंटल
बाजरी- 2,625 रुपये प्रति क्विंटल
मक्का- 2,225 रुपये प्रति क्विंटल
मूग- 8,682 रुपये प्रति क्विंटल
तूर- 7,550 रुपये प्रति क्विंटल
उडीद- 7,400 रुपये प्रति क्विंटल
तीळ- 9,267 रुपये प्रति क्विंटल
भुईमूग- 6,783 रुपये प्रति क्विंटल
रेपीसीड- 8,717 रुपये प्रति क्विंटल
सूर्यफूल- 7,280 रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन- 4,892 रुपये प्रति क्विंटल