अन् देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले अरे नालायकांनो…

0

मुंबई । 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही, तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच भाजपचे उमदेवार आणि ज्‍येष्‍ठ सरकारी वकिल उज्‍ज्‍वल निकम यांच्‍यावरही त्‍यांनी गंभीर आरोप केले. यामुळे ऐन निवडणूकीत नवीन वाद सुरू झाली आहे.

यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत बोलताना विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईतील सभेत बोलतांना म्हणाले,’कसाब आला तेव्हा पंतप्रधान अमेरिकाकडे गेले आणि आमच्याकडे पुरावे आहेत, असे म्हणाले. आता तुम्ही त्यांना रागवा. आता मोदींनी नवा भारत तयार केला आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून एअर स्ट्राईक केलं.

ते पुढे म्हणाले,’आज काँग्रेसचे लोक म्हणतात की, करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही. अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा. मात्र शहीदांवर असे बोलू नका. उज्ज्वल निकम यांनी कसाबला शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आज काँग्रेसचा पंजा कसाबसोबत आहे, आणि उज्ज्वल निकम महायुतीसोबत आहे.’ असेही ते म्हणाले.

त्यांनी पुढे दावा केला की,’महाराष्ट्रात 4 चरणातील निवडणूक आता पूर्ण झालीय. आता शेवट 20 तारखेला होणार आहे. आता मुंबईच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मी तुम्हाला खुशखबरी देऊ इच्छितो की, पहिल्या चार टप्प्यातच महाविकस आघाडी आणि इंडीया आघाडीचा सुपडा साफ केला’ असा मोठा दावा फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

Leave A Reply

Your email address will not be published.