पाचोरा येथे उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
जळगाव । जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचल्याने उष्णतेच्या प्रचंड झळा बसत आहे. या उन्हाच्या काहीलीने पाचोरा येथे एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेला तरुण हा फळ विक्रेता असून त्याला अचानक भोवळ येऊन तो खाली कोसळला आणि पाचारो ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले आहे.
पाचोरा येथे उष्माघाताने एक तरुण आनंदा नथ्थू भोई ( वय ३४, रा. जवाहर हाऊसिंग सोसायटी, बाहेरपुरा) या तरुणाला भोवळ आली आणि तो खाली कोसळला.आनंदा भोई हा तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळविक्री करत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्याला तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार आनंद भोई यांच्यात उष्माघाताची लक्षणे आढळून आली असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.


आनंदा नथ्थू भोई असे ३४ वर्षीय उष्माघाताने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान उष्माघातापासून बचाव साठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी दुपारचे वेळी बाहेर पडू नये ,असे आव्हान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी अशा देखील सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत