जळगावात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल या दरम्यान राहणार बंद?

0

जळगाव । सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे.जळगाव शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला असून , उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणरणत्या उन्हामुळे नागरिकांमध्ये त्रास वाढला असून, या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून जळगाव वाहतूक शाखेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेने जळगाव शहरातील दुपारी १२ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सात चौकांमधील हे सिग्नल यलो ब्लिंकर मौडवर राहणार आहेत.

जळगाव शहराचे तापमान वाढत असल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दुपारनंतर घराबाहेर पडणेही मुशकील झाले आहे. अशा स्थितीत महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या वाहनचालकांना ट्रॅफिक सिग्नलवर थांबावे लागते. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील सात ट्रॅफिक सिग्नल यलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला, तसे पत्र वाहतूक शाखेने महापालिकेला दिले आहे. त्यानुसार हे सिंग्नल दुपारी १२ ते ५:३० वाजेदरम्यान सिंग्नल ब्लिंकर मोडवर राहणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांनी चौकातून जाताना वेगाचेही पालन करत वाहतूक सिंग्नल पार करताना वाहनचालकांना थांबून, दोन्ही बाजूंना पाहून पढे जावे लागणार आहे.

या चौकातील सिग्नल राहतील यलो ब्लिंकर मोडवर
उन्हामुळे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, अजिंठा चौक, शिवकॉलनी चौक, कालिका माता चौकातील सिग्नल बंद ठेवून ते येलो ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.