जळगावला मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान उच्चांक गाठणार
जळगाव : जळगाव जिल्हा तीव्र तापमानासाठी ओळखला जातो. यावर्षी जळगाव जिल्ह्यात मार्च आठवड्यापासूनच ४० अंशाच्या पार तापमान जाणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्तक राहण्याचे सांगितले आहे. स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
जळगाव जिल्ह्याचे तापमान मे महिन्यात सर्वाधिक कमाल पातळीवर जात असते. 47 ते 48 अंशापर्यंत तापमानात वाढ होते. एप्रील व मे मध्ये दोन महिने जळगाव जिल्हा तापमानाचा उच्चांक गाठतो. मात्र यावर्षी हवामान खात्या विभागाने मार्च च्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा उच्चांक जळगाव जिल्हा गाठणार असल्याचे संकेत दिले आहे. आज जळगाव जिल्ह्याचे तापमान 38.5 किमान आणि कमाल 16.3 होते
यामुळे रविवार पर्यंत हे तापमान 43° पर्यंत जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना 11 ते 4 या वेळेस घराबाहेर पडू नये काम असेल तर बाहेर पडावे तसेच आरोग्याच्या संबंधित कोणतीही समस्या असेल संबंधित डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे. लहान मुलांनी यावेळेस घराबाहेर पडू नये त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.