जळगावात दोन गटाच्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना दुसरीकडे जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरात दोन गटाच्या तुफान हाणामारीत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६ रा.राज मालती नगर जळगाव) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील राज मालती नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय-२८, जानू संजू पटेल वय-२०, फैजन राजू पटेल वय-२४ आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय-४२ सर्व रा. राजमालती नगर हे सर्व जखमी झाले आहे.

जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणातील ७ ते ८ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.