केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट; 6 पिकांच्या एमएसपीमध्ये भरघोस वाढ
नवी दिल्ली । दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने रब्बी हंगामातील सहा पिकांच्या एमएसपीमध्ये भरघोस वाढ केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांच्या ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियान’ला मंजुरी दिली आहे.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा अनेक निर्णय घेण्यात आले. यात रब्बी हंगामातील ६ पिकांना म्हणजेच गव्हू, हरभरा, मसूर, मोहरी, जव आणि सूर्यफूलच्या बियांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केलीय.
मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नवीन एमएसपी दरांमध्ये गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता हा नवीन दर २,४२५ रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे मोहरीच्या एमएसपीमध्ये ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याचा नवीन खरेदी दर ५,९५० रुपये प्रति क्विंटल असेल. सरकार शेतकऱ्यांकडून या किमान किमतीवर शेतमालांची खरेदी करत असते. त्याला किमान आधारभूत किमत म्हटलं जातं.
बाजारात या पिकांचे दर सरकारच्या एमएसपीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात. एमएसपी थेट पिकांच्या सरकारी खरेदीशी संबंधित आहे. देशात अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने खरेदी करते आणि नंतर ते सरकारी गोदामांमध्ये साठवत असते.
आता नवीन एमएसपी दरांमध्ये, बार्लीच्या दरात १३० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा नवीन दर १,९८० रुपये प्रति क्विंटल असेल. त्याचप्रमाणे हरभरा (देशी) च्या एमएसपीमध्ये २१० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे आणि त्याचा नवीन दर ५,६५० रुपये प्रति क्विंटल असेल. सरकारने मसूरच्या दरात २७५ रुपये वाढवण्यात आलीय. एमएसपी दरात ६,७०० प्रति क्किटल आहे. तर तीळ आणि सूर्यफूलाच्या बियाच्या दरात १४० रुपयांची वाढ करण्यात आलीय.