नांद्रा येथे बिबट्याने पडला हरणाचा फडशा ; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील शेतात मध्यरात्री बिबट्याने हरणाचा फडशा पडल्याची घटना उघडकीस आली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांद्रा शिवारातील गणेश रामचंद्र सोनवणे यांच्या शेतात साई मंदिराजवळ मृत्यूमुखी पडलेले हरण आढळले.
शेतात बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसल्याने बिबट्या परिसरातच असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. दीड महिन्यापूर्वी नांद्रा गावातील एका शेतकऱ्याच्या वासरूचा फडशा बिबट्याने पाडला होता. पुन्हा हरणाचा फडशा पाडला आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजूरांना शेतात व
वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, बिबट्याचा बंदोबस्त करण्याविषयी आश्वासन दिले नाही.
नांद्रा परिसरात बागायती केळी आहे. बिबट्याला शेतात आसरा मिळू शकतो. तो केव्हाही पुन्हा प्राण्यांवर, नागरिकांवर हल्ला करू शकतो. या परिसरात हरणाचे अनेक कळप आहेत. ससे, लांडोरही आहेत. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.