जूनच्या पहिल्याच दिवशी राज्यातील या १० जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान

0

मुंबई । यंदाच्या मे महिन्यात तापमानाने कहर केला. असह्य उकाड्याने हैराण करणारा मे महिना संपला असून जुन महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यात या १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कमाल तापमान राहणार असल्याचे नोंदवण्यात आले.

हवामान विभाागाने आज काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान राहणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात आज तापमानाचा उच्चांक जाणवण्याची शक्यता आहे. ४७ अंश सेल्सियसपर्यंत पारा जाण्याची शक्यता असून नागरिकांना प्रचंड उष्ण तापमान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पुण्यासह पालघर भागात आज ३४ ते ३६ अंश तापमान राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये पारा ४२ अंशांपुढे
१.अकोला ४७.३
२.छत्रपती संभाजीनगर ४४.७
३.भंडारा ४५
४.चंद्रपूर ४४.२
५.धुळे ४४.४
६.हिंगोली ४२
७.लातूर ४३.२
८.नागपूर ४४.८
९.नांदेड ४२.५
१०.नंदुरबार ४२.३
११.वर्धा ४७
१२.यवतमाळ ४४.२

Leave A Reply

Your email address will not be published.