खरीप हंगाम तोंडावर शेतकऱ्यांना झटका देणारी बातमी ! बियाण्यांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ

0

जळगाव । खरीप हंगाम तोंडावर आला असून अशातच बियाण्यांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मका, ज्वारी, मूग बियाण्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५० ते ४०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे बजेट कोलमडले आहे. वाढवण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत कमी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

दरम्यान, शेतकऱ्यांना १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू झालेले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी खते व बियाणे खरेदी करत आहेत. यंदा खतांच्या पोटॅश वगळता रासायनिक खतांच्या किमतीत फारशी दरवाढ झालेली नाही. सन २०२१-२२ मध्ये पोटॅशची बॅग ८९० रुपयांना होती. यंदा पोटॅशचे दर १६५५ रुपयांपर्यंत दुपटीने वाढले आहेत.

बियाणांचे दर असे :
गेल्या वर्षी २०२३ मध्ये मकाचे दर १६०० रुपये होते. ते आता २००० रुपयांवर गेला आहे. उडीद ११०० रुपायांवरून १४५० रुपायांवर, मूग ९५० रुपयांवरून १२५० रुपयावर, ज्वारी ४०० रुपयांवरून ६५० रुपयावर गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.