तापमानात वाढ झाल्याने केळी बागा संकटात

0

यावल : तालुक्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी उन्हाचा पारा अधिक जाणवत आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा रविवारी प्रथमच ४५.१ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला. यामुळे शहरात अघोषित संचारबंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

गेल्या आठवड्याभरात सलग तापमान हे ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. यामुळे सध्या अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय नागरिक घराबाहेर फिरताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे केळी बागा व इतर पिके हे पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. वैद्यकीय सूत्रांनुसार वाढत्या तापमानात फिरताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान हीच स्थिती रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांमध्ये देखील आहे. तर हवामान विभागाकडून १९ ते २४ मे दरम्यान संपूर्ण खान्देशातच उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी तापमानाची उच्चाकी नोंद झाली. येत्या काही दिवसांत तापमान आणखीनच वाढते की काय? याची चिंता नागरिकांना आदे

Leave A Reply

Your email address will not be published.