धक्कादायक! राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या

0

बुलढाणा । राज्यात शेतकरी आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नसून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. याच दरम्यान आता राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने सणाच्या दिवशीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे उघडकीस आली.

कैलास नागरे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या कैलास नागरे यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहून आपले मनोगत व्यक्त केले.

बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथे युवा शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत शासनाच्या दुर्लक्षाचा उल्लेख केला आहे. कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे संतापाची लाट उसळली आहे.

पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी ठोस आश्वासन देईपर्यंत मृतदेह नेऊ दिला जाणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमले असून, पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे.

काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट!
आत्महत्येपूर्वी कैलास नागरेंनी लिहिली ४ पानांची सुसाईड नोट! आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही; खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी..
केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना म्हणाले, माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारा…
मुलांचे शिक्षण करण्यासाठी, सुखदःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं,बाबा,बायको यांनाही शून्य करूनच जातोय..

Leave A Reply

Your email address will not be published.