सोयाबीन खरेदीबाबत राज्याच्या पणन विभागाने दिलं स्पष्टीकरण

0

मुंबई । सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून यातच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केल्याच्या बातम्या समोर आल्या.

मात्र ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, देशभरात ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १९.९९ लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केंद्र सरकारने केली आहे. ज्यामुळे ८ लाख ४६ हजार २५१ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तर महाराष्ट्रातून केंद्र सरकारने ११.२१ लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केले आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडली असून सोयाबीन खरेदी केंद्राला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.