हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गरीब कुटुंबाला आत्तापर्यंत शासनाचा कुठलाच लाभ मिळाला नाही

0

प्रतिनिधी दिलीप गायकवाड

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असणारी ब्रह्मवाडी गाव या गावांमध्ये एक अत्यंत गरीब कुटुंब राहत आहे या कुटुंबामध्ये एक मुलगी असून दोघे आई-वडील म्हातारे आहेत मुलीचे लग्न झाले असून त्या कुटुंबातील दोघं म्हातारे असून घरातील कर्ता धरता व्यक्ती च अपंग आहे व बहिरा आहे या गावांमध्ये त्यांना स्वतःची शेती ही नाही व राहायला घर नसून ते गेल्या पन्नास वर्षापासून एका झोपडीत राहात असून कसाबसा उदरनिर्वाह करतात राज्यामध्ये शासनाच्या गोरगरिबांसाठी बऱ्याच काही योजना आल्या आहेत पण या गरीब कुटुंबाला अद्याप कुठलीच शासनाची योजना मिळाली नाही या कुटुंबीयांनी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत मार्फत घरकुलासाठी कागदपत्राची पूर्तता करूनही त्यांना अद्याप घरकुल मिळाले नाही

त्यांनी ज्या वेळेस शासकीय कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांना पुढच्या टप्प्यात घरकुल मिळेल असे आश्वासन त्यांना ग्रामपंचायत मार्फत वारंवार कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले आहे गावातील सरपंच व मेंबर या लोकांनकडे गेल्या दहा वर्षापासून सतत कागदपत्र घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारूनही कुठल्याच कागदपत्राची दखल ग्रामपंचायत मेंबर व सरपंचांनी घेतली नाही व त्यांना कोणी नसल्यामुळे निराधार ची पगारही कागदपत्र देऊन अद्याप चालू झाली नाही अशा या असाय कुटुंबाला शासनाने सहायता करावी व खरोखरच या कुटुंबाला आधाराची गरज आहे असे गावातील बऱ्याच काही नागरिकांनी सांगितले या कुटुंबाला विचारले असता कुटुंबाने सांगितले

शासनाने जर मला मदत नाही केली तर मी अपंग व बहिरा आहे माझे वय 60 65 वर्षाच्या वर आहे मला कुठले काम धंदा होत नाही मला मूल नाही एक मुलगी आहे तिचं लग्न झालं आहे जावई दारुड्या आहे आम्हाला कोणाचाच आधार नाही मग मी कशाच्या माथे जगू व माझ्या बायकोला कशाच्या माथे जगूऊ मी शासनाला हात जोडून विनंती करतो की आम्हा दोघा नवरा बायकोला निराधार ची पगार चालू करावी व राहायला घरकुल मंजूर करून द्यावे शासनाने आम्हाला मदत नाही केली तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले शासनाने या कुटुंबाला योजनेअंतर्गत खरोखरच मदत करावी असे गावातील नागरिकांना वाटतं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.