सावधान! राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

0

मुंबई । गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या जनतेला आता दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची सुरुवातच जोरदार झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.

त्यानंतर सोमवारी १० जून रोजी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई , पालघरला यलो अलर्ट तर ठाणे पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.