महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता! जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
मुंबई/जळगाव : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज मंगळवारी संपूर्ण राज्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. यामुळे सोयाबीन, कापूससह इतर पिकांना मोठा फटका बसणार आहे.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, देशाच्या उत्तरेकडून नैऋत्य मोसमी पावसाची माघार होत आहे. राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून पावसाने एक्झिट घेतली आहे. महाराष्ट्रातही परतीचा पाऊस सुरु झाला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या ७२ तासांत जोरदार पावसाची हजेरी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मंगळवारी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडडाटासह तुफान पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागानं संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
यलो अलर्ट :
आज हवामान खात्यानं पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड.