नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

0

राज्यात मागच्या काही दिवसापासून कडाक्याचे ऊन पडत असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडत असून पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.दरम्यान जळगाव जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे उष्णतेने होरपळून निघत असलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने आज विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा घसरला आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आत गेला आहे. मागील काही दिवसांपासून पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, नागपूरसह, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ भागात तशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ७ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना आणि शेतामध्ये जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‎आज अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली येथे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. ‎तर, उर्वरीत राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.