राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

0

मुंबई । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आनंदाची बातमी आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तसेच मुंबई, मुंबई उपनगर, पालघर,जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.