पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

0

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं आर्थसहाय्य केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील ६ जणांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, ‘या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहोत. जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.