जळगाव जिल्हावासियांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’ची अनुभूती; दिवसभर असह्य उकाडा

0

जळगाव । जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने उसंती घेताच जिल्ह्यातील तापमानात मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसाचे तापमान ३५ अंशाच्यावर तर रात्रीचे २७ अंशादरम्यान आल्यामुळे जिल्हावासियांना ऐन सप्टेंबर महिन्यातच ‌‘ऑक्टोबर हीट’ अनुभवास येत आहे.

दरम्यान, हवामान खात्यानं आजपासून आगामी तीन चार दिवस जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी केला, मात्र आजही दिवसभर असह्य असा उकाडा जाणवत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी अकरानंतर मोठ्या प्रमाणावर कडक ऊन्हाचे चटके जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे.

तापमानाचा पारा दोन-तीन अंशाने वर चढल्याने उकाड्यात वाढ होऊन नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर एप्रिल मे महिन्याप्रमाणे घामाच्या धारांनी नागरिक ओलेचिंब होत आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी आजारांनी डोके वर काढले काढले.

परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कडक उन्ह जाणवत आहे.यातच हवामान खात्यानं आजपासून आगामी तीन दिवस जिल्ह्याला पावसासचा येलो अलर्ट जारी केला. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे गारवा निर्माण आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.