नव्या सर्वेक्षणामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली; राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार?
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन अडीच महिन्याचा कालावधी आहे. राज्यामध्ये यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होणार आहे. मात्र त्यापूर्वीच्या राज्यात महायुती आपलं सरकार कायम राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार? असे अनेक प्रश्न सध्या सर्वांसमोर आहेत. यातच टाइम्स नाऊ, नवभारत आणि मॅट्रिझ यांनी एकत्रित सर्वेक्षण केलंय.
ज्यात राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जातेय. या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत जरी महाविकास आघाडीची सरस झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीची कामगिरी सरस ठरणार असल्याचं चित्र आहे.
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार?
या सर्वेक्षणामध्ये महायुतीला १३७ ते १५२ तर महाविकास आघाडीला १२९ ते १४४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. पक्षांचा विचार केलास, भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
कोणता पक्ष किती जागा जिंकेल?
ओपिनियन पोलमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ६.८ टक्के मतांसह ४२ ते ५२ जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. अजित पवार गट २.८ टक्के मतांसह ७ ते १२ जागा जिंकेन, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाविकास आघाडीत काँग्रेसची कामगिरी उत्तम ठरू शकते. काँग्रेस १६.२ टक्के मत मिळवत ५८ ते ६८ जागा जिंकेन, असा अंदाज आहे. तर उद्धव ठाकरे गटाला १४.२ टक्के मतांसह २६ ते ३१ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला १३.७ टक्के मतांसह ३५ ते ४५ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.