एसडीआरएफची बोट बुडाली ; भडगावच्या जवानासह तिघांचा मृत्यू
भडगाव | अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन जवांनाचा मृत्यू झाला असून यात भडगाव तालुक्यातील पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की, अकोले येथे प्रवरा नदीत दोन मुले बुडाली. या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.
आज कर्तव्यावर असतांना हुतात्मा झालेले जवान वैभव वाघ हे धुळे पोलिस दलातील म्हणून कार्यरत होते. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे बोट दुर्घटनेत तीन जवानाचे दु:ख निधन झाले, त्यात वैभव वाघ यांचेही निधन झाले. वैभव वाघ यांचे बालपण हे पिचर्डे गावी आजोबा यांच्या कडे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, अतिशय हुशार अभ्यासु होते घरची परिस्थिती गरिबीची होती त्यातून यश मिळवत पुढे त्यांनी पुढील शिक्षण हे भडगाव येथे घेतले. अवघ्या बारा दिवसांचा असतांनाच वडीलाचे छत्र हरपले त्यांनतर पुढील शिक्षण हे भडगाव येथे झाले डी.एड सोबत बी्यचे शिक्षण घेतले त्यांनतर २०१४ मध्ये ते गोरेगाव मुंबई येथील भरती झाले त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजु झाले होते.