16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला ; हवामान विभागाची घोषणा
मुंबई । राज्याच्या हवामान इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे.
आज सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे.पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे .
आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे . आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड,लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे .
पुण्यात मान्सून दाखल
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे .मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून काल रात्रीपासून मुंबईसह पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली .अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे . पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता .गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे .
हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागांना दिली असून पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचं ही सांगितलंय. मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी अध्यापक पेरण्या करू नये असे सांगण्यात येत आहे.