माता रमाई,सावित्री,जिजाऊ ची स्मृती करून दिव्यात (मुंबई) साधे पणाने महिला उत्सव साजरा

0

महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात अति उत्साहात महिला दिन साजरा होत असताना च दिव्यात मात्र बेडेकर नगर पंचशील ग्रुपच्या माध्यमातून महिला विकास संघटनेने अतिशय साधेपणाने हा उत्सव मन मोकळेपणाने साजरा केला,यावेळी संघटनेच्या क्रियाशील वक्त्या सुजाता अमोल मोरे म्हणाल्या की महिला दिन म्हणजे नेमकं काय आणि ह्या दिवसाला एवढे महत्त्व प्राप्त का झालेले आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.

तर निसर्गाने महिलेला प्रेमळ, मधुर,गोड, सौंदर्या सोबत च जिद्दीची भरपूर बुद्धिमत्ता, आणि जशास तसे म्हणजेच पोशास ठोसा मारण्याची ताकद बहाल केलेली आहे आणि म्हणूनच येथे सावित्री, रमाई,जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई सारख्या किती झाल्या…? शिवरायां ची तलवार आणि बाबासाहेबांच्या लेखणी वर इंदिरा, प्रतिभाताई आणि द्रोपदी मुरमु, सारख्या राष्ट्रपती झाल्या…! बुद्धिमान महिलांच्या बलिदानामुळे त्यागामुळे आज झालेल्या आमच्या महिलांच्या प्रगतीमुळेच आमच्यात आज हा विश्वास निर्माण झाला…
की माय बापाने जन्म दिला, आणि महिलांच्या बलिदानाने स्वाभिमानाचा श्वास आला…

प्रेम,जिव्हाळा,आपुलकी आणि आदराची भावना म्हणजेच आजची महिला असली पाहिजे…आणि महिलांच्या वागण्यातून सुद्धा पदोपदी जिजाऊ आणि रमाईची माया ममता दिसली पाहिजे…या मधुर शब्दात त्यांनी कौतुक केले तसेच वनिता मोरे यांनी सर्वांचे अभिनंदन करून कार्यक्रमाची सांगता केली यावेळी उपस्थिता मध्ये प्रामुख्याने सुप्रिया ताई जाधव, वनिता कोमल मोरे, नमिता सावंत,सुजाता मोरे,नयना बोगसकर,मेघा तेलंग,कासारे ताई,साळवे ताई,समीक्षा ताई तेलंग, भारती पडळ, ममता धीमत,कविता वाघ,स्वाती जाधव सोनिका तांबे, आशा यादव, प्रियांका पाटील, मेघना लोखंडे उपस्थित होते तर, कार्यकर्त्यां मध्ये अमय मोरे, अमोल मोरे, सुदेश तेलंग, अमोल जाधव,सुशांत सावंत, अमोल मोरे,शोभित मोरे, निलेश बोगसकर,गौरव वाघ, गणेश धीमत, निकेश जाधव, अक्षय साळवे, महादेव वाघ, बबन तांबे यासोबत,कवी गीतकार सुनील काटे,तसेच लेखक गीतकार नवराज तायडे या सर्वांचे उपस्थितीने आणि साधेपणाने पण उत्साहवर्धक वातावरणात या महिला दिवसाच्या उत्सवाला रंगत आली होती केक कापून या कार्यक्रमाचे आदरणीय तेलंग ताईंनी आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.