महाराष्ट्रात आजपासून ४ दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी असून हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबईसह उपनगरात आजपासून पुढील ४ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असून त्यानंतर १२ जूनपर्यंत मुंबईत येणार, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.