4 जूननंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

0

मुंबई । देशभरात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका सुरु असून अशातच भाजपते नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मोहित कंबोज यांनी एक्स अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. कंबोज म्हणाले, “4 जून नंतर उद्धव ठाकरे सेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटणार आहे. शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी एसपीचे उर्वरित आमदार व नेते पक्षाला रामराम करणार आहेत. अनेक आमदार, खासदार, नेते शिवसेना व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा कंबोज यांचा दावा केला आहे. “फिर से खेला होबे” म्हणत कंबोज यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. आता मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.