अस्तिका समाज, माटुंगा, मुंबई भगवान कार्तिकेय स्वामी यांच्या सहयोगाने अष्टबंधन महा कुंभाभिषेकमचे आयोजन
मुंबई, अस्तिका समाज भगवान कार्तिकेय स्वामी हे मंदिर १०२ वर्षांपासून माटुंगा, मुंबईत स्थापित असून याची प्रसिद्धी सर्व दूर पसरलेली आहे. आजपर्यंत अनेक भाविक भक्तांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे. मंदिरात रोज पूजा असते, आशीर्वादासाठी अनेक भक्तांची रिघ लागलेली असते.
अस्तिका समाजने भाविकांची मनोकामनापूर्ती होण्यासाठी दिनांक २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ ह्या सात दिवसांत अष्टबंधन कुंभाभिषेकमचे आयोजन केले आहे. अष्टबंधन महाकुंभाभिषेक हा १२ वर्षांतून एकदा येणारा अत्यंत आध्यात्मिक महत्त्व असलेला वैदिक विधी आहे. हे मंदिराच्या देवतांच्या पुनर्संवर्धनाचे आणि गोपुरम (बुरुज) च्या पवित्रीकरणाचे प्रतीक आहे, मंदिराच्या आध्यात्मिक आभाला पुन्हा ऊर्जा देते. प्रत्येक बारा वर्षानंतर येणारा हा योग आहे. यावर्षी भक्तांना ही संधी मिळत आहे.
सर्वसाधकम् शिवगमरथनम, शिवगमकलानिधी, शिवश्री – आर. सेल्वम भट्टर (उर्फ) कल्याणसुंदरशिवाचार्य आणि त्यांच्या ५० शिष्यांसह महा कुंभाभिषेक करणार आहेत.
ह्या सात दिवसात होणाऱ्या पूजा : भगवान श्रीमहागणपती, भगवान श्री शिव, भगवान श्री कार्तिकेय स्वामी आणि नवग्रह देवता या चार पूजा संपन्न होणार आहेत. देवतांसाठी हा महाकुंभभिषेक केला जाईल, ज्यात देशभरातून आणि बाहेरून हजारो भाविक उपस्थित राहतील. तसेच
होमम (अग्नी विधी): प्रसिद्ध वैदिक विद्वानांनी केले जाणारे, हे विधी सार्वभौम शांती आणि समृद्धीसाठी दैवी आशीर्वाद देतात. पूजा: प्रमुख देवतांना समर्पित दैनिक महाकुंभभिषेकमची विस्तृत पूजा. अन्नदानम (अन्न वितरण): मोफत प्रसादम (पवित्र अन्न) हजारो भक्तांना ईश्वरी सेवा आणि समाज कल्याणाचे कार्य म्हणून दिले जाते. प्रत्येक दिवशी अन्नदान करण्यात येणार आहे.
२७ जानेवारीची पूजा सकाळी ०६. ३० ते ११. ०० पर्यंत व संध्याकाळी ०६ ते ०८. ३० पर्यंत, २८ जानेवारी – सकाळी ०८. ३० ते ११. ०० व संध्याकाळी ०६.०० ते ०८. ३० पर्यंत, २९ जानेवारी -सकाळी ०७.२५ ते ११.०० व संध्याकाळी ०६.०० ते ०८.०० पर्यंत, ३० जाने. सकाळी ०८.३० ते ११.०० व संध्याकाळी ०५.३० ते ०९.०० पर्यंत, ३१ जाने. सकाळी ०८.३० ते ११.३० व संध्याकाळी ०६.०० ते ०८.३० पर्यंत, १ फेब्रुवारी – सकाळी ०८.३० ते ११.३० व संध्याकाळी ०६.०० ते ०८.३० पर्यंत, २ फेब्रुवारी सकाळी ०७. ०० ते १०.०० व संध्याकाळी ०४.०० ते ०६.३० वाजेपर्यंत
भक्तांनी सर्व पूजेस उपस्थितीत राहून आशीर्वाद घ्यावा अशी विश्वस्त श्री. परमेश्वर अय्यर यांनी विनंती केली आहे.