लाच प्रकरणी महिला कर्मचाऱ्यासह दोघांना अटक ; लाचखोरांमध्ये खळबळ
जळगाव । एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, तक्रारदार यांचा भाऊ यांनी शेतातील निबांचे झाडे तोडुन मालेगांव येथे नेण्यासाठी ट्रक मध्ये भरुन घेवुन जात असतांना सावित्री फटाके फॅक्टरी समोर वन विभागाचे वनपाल वैशाली गायकवाड, एक वनविभागाचा कर्मचारी व सुनिल धोबी सॉ मिल वाले अश्यांनी पकडला होता. सदरचा ट्रक बेकायदेशीर लाकुड वाहतुक केल्याचे कारण सांगून वैशाली गायकवाड यांनी पकडला आणि सदर ट्रक हा श्रीकृष्ण सॉ मिल पारोळा येथे लावून दिला होता.


त्यानंतर तक्रारदार व तक्रारदार यांचा भाऊ असे वेळोवेळी वैशाली वनपाल गायकवाड व एक वन विभागाचे कर्मचारी अश्यांना भेटुन गाडी सोडण्याची विनंती केली असता वनपाल गायकवाड यांनी नमुद गाडी सोडण्याचे मोबदल्यात सुरवातीला 2,50,000/- रुपये ची मागणी केली, व त्यानंतर तडजोडीअंती वनपाल वैशाली गायकवाड व वनविभागाचा एक कर्मचारी यांनी 1,00,000/- रुपये खाजगी इसम सुनिल धोबी यांच्याकडे देण्यास सांगितले होते.