गिरीश महाजनांनी ‘माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत 7 वर्षे तुरुंगात ठेवले’; एकनाथ खडसेंचा आरोप

0

जळगाव । मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यानी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजन यांनी कुरुंदकर याच्या सोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्या आले. त्याला सात वर्ष विनाकारण कारागृहात काढावे लागले. निर्दोष सुटून आल्याच्या नंतर त्याने कारागृहाच्या ठिकाणी अतिशय नित्कृष्ट दर्जाचे जेवण कैद्यांना दिले जात असल्याचं आपल्याला सांगितले, अस खडसे यांनी म्हटल आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जळगाव कारागृहात पुरवण्यात येत असलेल्या वस्तूंमधून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. एकनाथ खडसे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांनी केलेल्या या आरोपाच्या बाबत आपण माहिती घेत असून, नंतर या बाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचं आणि या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे.

“एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, वाढत्या किंमतीने टेंडर घ्यायचे. खाली निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवायचं ही त्यांची मोडस ऑपरेंडी राहिलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला अशी तक्रार आहे. मी या प्रकरणाची माहिती घेतोय. माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत हा मुद्दा मांडणार आहे. मी चौकशीची मागणी करणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “मी जेलमधील घोटाळा प्रकरणाबाबत कुणाचं नाव घेतलं नाही. राजू शेट्टी यांनी घेतलं. लेकी बोले सूने लागे. ज्याने केलं आहे त्याला ते बरोबर लागतं”, असंदेखील एकनाथ खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.