जामनेर तालुक्यात पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

0

जामनेर । तालुक्यातील टाकळी येथील धीरज नारायण पवार (वय १८) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. शेतात काम केल्यानंतर हात पाय धुण्यासाठी तो विहिरीत उतरला. यादरम्यान, त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने बुडू लागला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेप्रमाणे जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धीरज नारायण पवार याच्या त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. आई-वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तर दोन्ही मुले देखील आई-वडिलांना मदत करतात. दरम्यान बुधवारी दि. ३ जुलै रोजी टाकळी बु. गावा लगत पिपळगांव गोलाइत शिवारात शेतात धीरज हा कामाला गेला होता.(केसीएन)शेतात खत देण्याचे काम आटपून नंतर दुपारी तीन वाजता घरी जाण्याची तयारी करीत असताना विहिरीत हात पाय धुण्यासाठी धीरज विहिरीत खाली उतरला.

मात्र विहिरीत त्याचा पाय घसरला व पाण्यात पडला. धीरज याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन धीरजला जामनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.(केसीएन) मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक दीपक रोठे करीत आहे. दरम्यान तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.