खुशखबर! जळगाव मुंबई विमानसेवा या तारखेपासून सुरु होणार

0

जळगाव । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, जळगाव विमानतळावरून आता मुंबईसाठी येत्या २० जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस जळगावहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेणार आहे.

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान 5.0 योजनेंतर्गत सुरुवातीला जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

या अंतर्गत २० जूनपासून अधिकृतपणे मुंबई-जळगाव-मुंबई या विमानसेवेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी मुंबई- जळगाव ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून सदरची विमानसेवा नियमित केली जाणार असल्याचे अलायन्स एअर या विमान कंपनीकडून सांगण्यात आले.

जळगाव ते मुंबई विमानसेवेचा जळगावकरांना मोठा लाभ होणार आहे. या सेवेमुळे मंत्रालयीन कामानिमित्त तसेच इतर खासगी कामानिमित्त मुंबईचा प्रवास करणाऱ्यांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. रेल्वेच्या तुलनेत हा प्रवास खूपच कमी वेळात होणार आहे.

असे आहेत वेळापत्रक अन् तिकीट दर
जळगावातून संध्याकाळी ६.४५ वाजता फ्लाइट उड्डाण भरून मुंबईत ८.५ वाजता पोहचेल. परतीला रात्री ८.३० वाजता फ्लाइट निघून मुंबईत ९.४५ वाजता पोहचेल. विमान कंपनीने तिकीट विक्री सुरु केली असून या रुट्या आरसीएस सेवेत समावेश नाही. त्यामुळे तिकिटाची सुरुवात ३४४० रुपयांपासून होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.