वादळाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले अश्रू.. जळवात केळी पिकांचे मोठे नुकसान

0

जळगाव : राज्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा फटका पाच तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस होऊन जिल्ह्यातील पाच तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. पाच तालुक्यांतील ५८ गावांमधील १ हजार ७२० शेतकऱ्यांच्या केळी व पपई पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, यावल या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच तालुक्यांना दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा दिला. जिल्ह्यातील सुमारे ५९ गावे बाधित झाली असून १ हजार ७२० हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यात पपईची पिके नष्ट झाली असून एकूण १ हजार ७५० हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.