धक्कादायक! अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीय कामगारांना चिरडले

0

जळगाव | जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुणांनाअज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब मंगळवारी (दि. ११) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावाच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करीत होते. रात्री सात ते आठ वाजेपर्यंत काम सुरू होते काम संपल्यानंतर सिकंदर नातू सिंग राजपूत जोगिंदर मिठीलाल राजपूत व योगेश कुमार राजबहादुर राहणार युपी हे तिघही त्याठिकाणी झोपले. मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले आहे.

घटना मंगळवारी 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

माध्यमांशी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश व रेड्डी यांनी सांगितले की अज्ञात वाहनाने त्या तिघांना चिडले आहे. मात्र ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी फक्त कामाचे डंपर किंवा इतर गाड्या यांचीच वाहतूक आहे. त्यांचा तपास घेण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.