इंदिरानगर येथे रामलीला महोत्सव; नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून शुभारंभ

0

ठाणे । ठाणे मधील इंदिरानगर येथे विकास मंडळ द्वारा रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या महोत्सवात समाज रत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलित करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष अंजनीकुमार सिंह यांनी नानजीभाई ठक्कर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या संस्थेद्वारा येथे ३५वर्षा पासून रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते .याप्रसंगी समाजरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला ,श्री अंजनी कुमार सिंह ,श्री महा राम यादव ,श्री अंबरनाथ गुप्ता ,श्री कमल सिंह ,श्री राकेश सिंग ,श्री अशोक सिंह,श्री शेषराज सिंह,श्री रजनीश सिंह तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .नानजीभाई यांनी सांगितले की संस्थेद्वारा या रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मी ३५वर्षापासून या रामलीला महोत्सवात सहभागी होतो .दरवर्षी हजारो पेक्षक या रामलीलाच्या लाभ घेतात .माझी या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की या नाटकात जे कलाकार आहेत ते आपले पात्र चोखपणे भूसवितात .आपण या पात्रांची म्हणजेच रामलीलेतील प्रभू श्रीराम यांच्याप्रमाणे आपल्या जीवनात आचरण करण्याच्या वागण्याचा प्रयत्न करूया .प्रभू रामचंद्रानी आपल्या वडिलांच्या एका शब्दावर 14 वर्षांच्या वनवास भोगला .आपल्या आचरणात बदल करून नवीन सुधारणा करणे गरजेचे आहे .व्यसन करीत असाल तर व्यसनमुक्त व्हा. आपण संकल्प केल्यास सामाजिक कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांना त्यांचे कार्याचे सार्थक होईल.महिलांनी सुद्धा मसरी किंवा इतर व्यसन करू नये .३५वर्षा पूर्वी नयन बहादूर यांनी या संस्थेची स्थापना केली .आज यांचे सुपुत्र अंजनी कुमार सिंह हे या संस्थेच्या कारभार पाहतात.

Leave A Reply

Your email address will not be published.