राज्यात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा ; ‘या’ भागात कोसळणार पाऊस
राज्यात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा ; ‘या’ भागात कोसळणार पाऊस। काही दिवसापासून ब्रेक घेतलेल्या पावसाबाबत दिलासा देणारी बातमी समोर आलीय. हवामान खात्याने राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज बुधवारपासून मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात होईल. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसतील. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत असला, तरी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भातल्या अमरावतीपर्यंतचा भाग अद्याप मान्सूनने व्यापला नाही. येत्या ४८ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.