घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाकडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती उत्साहात साजरी
इगतपुरी । महाराष्ट्राच्या माती मध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला होता.त्या विश्वमाता,राजमाता,शिवमाता,स्वराज्यजननी जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथे झाला.राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाने इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या खैरगाव येथील,मुंबई व डहाणू बंदरातून नासिक बाजारपेठेत जाणाऱ्या माल वाहतुकीला संरक्षण देण्यासाठी ज्या गडकिल्ल्यांची साखळी पद्धतीने निर्मिती केली होती,त्यापैकी टेहेळणी किल्ला असलेल्या दुर्लक्षित “मोरधन किल्ल्यावर” जाऊन मंडळाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी मंडळाच्या प्रत्येक शिवभक्त मावळ्यांनी जिजामातेच्या शौर्याचे व स्वामी विवेकानंदचे स्मरण केले.जिजामाता यांच्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी तीव्र तळमळ,श्रद्धा,दृढनिश्चय,संयम,धर्माप्रती विशेष आदरभाव,निस्वार्थीपणा,व्यापक विचारसरणी,निर्भयपणा,नेतृत्व,धैर्य,युद्धनीती,त्याग करण्याची वृत्ती असे बहुआयामी गुण राजमाता जिजाऊंच्यात होते.त्यांच्या अशा निर्भय संस्कारांनीच छ्त्रपती शिवाजी महाराज घडविले गेले.त्यातूनच स्वराज्याची निर्मिती झाली.अशा थोर राजमाता जिजाऊंना तसेच विश्व धर्म महासभेत सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद यांना दुर्लक्षित “मोरधन किल्ल्यावर” कळसुबाई मित्र मंडळाच्या मावळ्यांनी जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले.
या जयंतीनिमित्त दुर्लक्षित ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मौल्यवान ठेवा सर्वांनी जपावा हा संदेश शिवभक्त मावळ्यांनी दिला.या दुर्लक्षित मोरधन किल्ल्यावर संपन्न झालेल्या राजमाता जिजाऊ जयंतीत कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे,रामदास चौधरी,संजय शर्मा,प्रवीण भटाटे,निलेश पवार,गोकुळ चव्हाण,सुरेश चव्हाण,नामदेव जोशी,सोमनाथ भगत,संजय शेवाळे,सुधाकर तांबे,शरद महाले,चेतन जोशी, उत्तम कुलथे, भगवान तोकडे, नाना टाकळकर,देविदास पाखरे,विजय किर्वे,पुष्कर पवार,सायरा खलिफा,नगमा खलिफा,गायत्री मराडे,प्रियांका मराडे तसेच इतर महिला भगिनी सहभागी झाले होते.