अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केवळ दोनच मंत्री सहभागी; एकनाथ खडसे संतापले, म्हणाले…

0

मुंबई । राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र यादरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ दोनच मंत्री सहभागी असल्याने संतापही व्यक्त केला.

अधिवेशन सुरु असून या आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, याबद्दल मी अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेतोय. एकनाथ खडसे संतापलेले पाहून शंभूराज देसाई म्हणाले, विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो. मी वेळेत आलो होतो, लिफ्टमुळे वेळ झाल्याने दोन सेकंद उशीर झाला, असं स्पष्टीकरण शंभुराज देसाईंनी दिलं आहे. यावर एकनाथ खडसे म्हणाले, सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसतं. मीही काही काळ मंत्री राहिलो आहे. मीही १५ वर्षे मंत्री होतो. पण जाऊद्या. सरकार किती असंवेदनशील आहे, याचं हे उदाहरण दिसतंय.”

दरम्यान खडसेंनी यावेळी हे घोटाळ्यांचं सरकार आहे.राज्यात घोटाळे थांबलेले नाहीत. जळगाव जिल्ह्यातील पीडब्ल्यूडीला एक सोनवणे नावाचा एक अधिकारी आहे. तो सरकारचा इतका लाडका आहे की त्याच्या भ्रष्टाचार विषयबाबत मी दीड वर्ष बोलत आहे. मागच्या काळात रविंद्र चव्हाण मंत्री असताना म्हणाले होते की, त्याला निलंबित करतो. परंतु काहीच केलं नाही. त्याच्यावर 9 चौकश्या सुरू आहेत. अधिवेशनाचा पूर्ण वेळ केवळ फालतू प्रकरणात गेला. कुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. यात मस्साजोग प्रकरण. मुंडे राजीनामा, कुणाल कामरा, औरंगजेब असले विषय झाले. इथ शेतकऱ्यांच्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे होती. अॅकेडमिक चर्चा होण गरजेचे होतं, मात्र ते झालं नाही. राज्याच्या तिजोरीत खळखळट आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.